नवा पैलू स्वाध्याय : नवा पैलू हा पाठ इयत्ता सहावीच्या पुस्तकातील आहे. या पाठच्या लेखिका आहेत प्रतिभा पानट आहेत. या ठिकाणी आपण नवा पैलू स्वाध्याय प्रश्नोत्तर स्वरुपात अभ्यासणार आहोत.
नवा पैलू स्वाध्याय
प्र १) – तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
१) आजी नातवाला लवकर चल, म्हणून घाई का करीत होती ?
उत्तर : आजी नातवाला दवाखान्यात घेऊन जात असताना आभाळ गच्च ढगानी दाटून आले होते. कुठल्याही क्षणी पाऊस कोसळेल असे वातावरण होते. बस स्थानकापासून दवाखाना जवळ होता, पण दिगू हळूहळू चालला हाता. पाऊस सुरू व्हायच्या आत दवाखान्यात पोहोचायाचे होते, म्हणून आजी नातवाला लवकर चल, म्हणून घाई करात होती.
२) रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यांत पाणी का आले ?
उत्तर : दिगूला ऐकू येत नव्हते. दवाखान्यात जाताना अचानक दिगू रिक्षाच्या समोर आला. रिक्षाचा आवाज आजीला ऐकू आला, पण दिगूला ऐकू आला नाही. रिक्षावाल्याला हे माहीत नसल्यामुळे तो दिगूवर ‘ बहिरा आहेस की काय?’ असे म्हणत ओरडला. आजीने रिक्षावाल्याचे बोलणे ऐकले. आपल्या नातवाच्या बहिरेपणाबद्दल वाईट वाटून आजीच्या डोळ्यांत पाणी आले.
३) वत्सलाबाईनी आजीला घरी येण्याचा आग्रह का केला ?
शहराच्या डॉक्टराबद्दल आजी जे पुटपुटत होती ते वत्सलाबाईंनी ऐकले होते. रिक्षावाल्याने दिगुला हटकलेलेही पाहिले होते. आजीची अवस्था व दिगुचे बहिरेपण वत्सलाबाईच्या लक्षात आले होते. वत्सलाबाई मूक-बधिर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. दिगूवर इलाज करता यावा, या उद्देशाने त्यानी आजीला घरी येण्याचा आग्रह केला.
४) शाळेत गेल्यावर आजीला आनंद का झाला ?
उत्तर:- वत्सलाबाई आजीला घेऊन मूक-बधिरांच्या शाळेत आल्या. शाळेत कानाला श्रवणयंत्र लावून बसलेली मुले, माईकमधून शिकवणार्या बाई हे सगळे आजीने पाहिले. बहिऱ्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार ऐकण्यास आजी आतुर झाल्या आणि ते मूल बाईसारखे हसत हसत बोलले. हे ऐकून आपला दिगूही असाच बोलेल अशी आजीने मनोमन कल्पना केल्यामुळे आजीला आनंद झाला.
५) मूक-बधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात कोणते विचार आले?
उत्तर:- वत्सलाबाईंच्या मूक- बधिर शाळेत दिगूला ठेवायचे असे आजीने ठरवले. आजीच्या मनात विचार आला की, आपल्याही खेड्यात अशी मूक- बधिर मुलाची शाळा काढली तर! आपले शेत विकून येणाऱ्या पैशांत मूक -बधिर मुलांची शाळा काढायचे आजीने ठरवले. आजीने विचार केला की आपल्या गावची मुले शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागेल. ती स्वत:च्या पायावर उभी राहतील.
प्र. २) का ते लिहा. ( नवा पैलू स्वाध्याय )
१) आजी शहरात गेली.
उत्तर:- दिगू बहिरा आहे हे कळल्यापासून आजी काळजीत होती. गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून दिगूचा चांगला इलाज व्हावा, म्हणून आजी शहरात डॉक्टरांकडे गेली.
२) आजी वत्सलाबाईच्या घरी गेली.
उत्तर:- दवाखाना बंद होता. पाऊस कोसळत होता. अशा परिस्थितीत वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला. ‘उद्या मी तुम्हांला जे दाखवीन, ते पाहून तुम्ही हसत घरी जाल’ या वत्सलाबाईंच्या सांगण्या वरून आजी त्यांच्या घरी गेली.
३) आजीने गावात शाळा काढायची ठरवले.
आजीला स्वत:च्या दुःखावरून सर्वच मुक्या मुलांच्या दुःखाची जाणीव झाली. आपल्या खेड्यातील मुलांचे भले व्हावे त्यांना शिकता यावे यासाठी आजीने गावात शाळा काढायचे ठरवले.
नवा पैलू स्वाध्याय | नवा पैलू स्वाध्याय इयत्ता सहावी.
प्र ३) थोडक्यात उत्तरे लिहा.
१) वत्सलाबद्दल पाच ते सहा ओळी लिहा.
वत्सलाबाई या मूक-बधिरांच्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांचा स्वभाव अत्यंत हसरा व आनंदी होता. त्यानी विचार केला की बोलकी मुले शिकतात, खेळतात, आनंदी जीवन जगतात. अशा मुलांना कोणीही शिकवौल, परंतु ज्यांच्या वाट्याला बहिरेपणाचे व मुकेपणाचे दुःख आले आहे, त्यांना कोण शिकवणार? या मुक्या कळयांना कोण उमलवणार?-अशा मुलांच्या चेह्यांवर अभिमानाचे, विश्वासाचे हसू फुलवायचे आणि त्यांच्यातले स्वत्व जागवायचे, असा पक्का निश्चय करून वत्सलाबाईंनी व्रतस्थपणे मूक-बधिरांच्या शाळेत शिक्षिकेचे काम स्वीकारले. त्यांनी दिगूलाही आपल्या शाळेत इलाजासाठी आणले.
२) या पाठाला ‘नवा पैलू’ हे शीर्षक आहे, ते योग्य कसे ते थोडक्यात लिहा.
उत्तर : आजीने दिगूला वत्सलाबाईंच्या मूक-बधिरांच्या शाळेत घातले. पण आपल्या नातवाचेच भले व्हावे, असा त्यांनी स्वार्थी विचार केला नाही. त्यांनी आपल्या गावीही अशी शाळा काढण्याचा विचार केला. त्यासाठी गावची जमीन विकून पैसा उभा करण्याचे ठरवले. आजीच्या मनातील ही दुसऱ्याबद्दलची उदात्त भावना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ‘नवा पैलू’ दर्शवते. म्हातारपणातही निस्वार्थीपणे समाजसेवेचा धडा आजीने इतरांना दिला. म्हणून ‘नवा पैलू’ हे शीर्षक मला योग्य आहे.
३) आजीच्या थोर विचारांबाबत पाच ते सात ओळी लिहा.
उत्तर : दिगूच्या आजाराबाबत आजी काळजीत होती. वत्सलाबाईंची शाळा पाहिल्यावर त्यांना आशेचा किरण दिसला. नातवाच्या दुःखावरून त्यांना इतर सर्वच मूक-बधिर मुलांच्या दुःखाची जाणीव झाली. त्यांचा मनात विचार आला. आपल्याही खेड्यात अशी मूक-बधिरांसाठी शाळा काढायला हवी. त्या लगेच कृतिशील झाल्या. शेत विकून शाळा काढूया. माझ्या गावची मुले शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागून ती स्वत:च्या पायावर उभी राहतील. असे उदात्त व क्रियाशील विचार आजीच्या मनात आले.
नवा पैलू स्वाध्याय इयत्ता सहावी.
प्र.४) पुढील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
- खंत करणे –: आपण आईचे ऐकले नाही याची राजूला खंत वाटली.
- स्वाभिमान -: प्रत्यकाने आपला स्वाभिमान जागृत ठेवणे आवश्यक आहे.
- विश्वासाचे हास्य फुलणे -: परीक्षेत मिळालेले यश पाहून मनीषाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
- पक्का निर्धार करणे : नवीन वर्षात सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याचा दीपा ने निर्धार केला.
- धक्का बसणे :- अथक प्रयत्न करूनही अपयश आल्याने बाबांना धक्का बसला..
- जाणीव होणे :- आजीला मुकबधीर मुलांच्या दुःखाची जाणीव झाली.
- थक्क होणे :– कोकणातील नैसर्गिक सौंदर्य पाहून मुले थक्क झाली.
नवा पैलू स्वाध्याय इयत्ता सहावी.
हे ही पहा…..