Skip to content

स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त स्वाध्याय इयत्ता चौथी

  • by

१. चुकीची जोडी ओळखा.

अ ) फलटण – निंबाळकर

आ ) जावळी – मोरे

इ ) सुपे – जाधव

चुकीची जोडी – सुपे – जाधव

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ ) जावळीच्या मोर्‍यांना आदिलशाहाने कोणता किताब दिला होता ?

जावळीच्या मोर्‍यांना आदिलशाहाने ‘ चंद्रराव ‘ हा किताब दिला होता.

आ ) जावळीचा फार महत्त्वाचा का होता ?

जावळीचा विजय फार महत्वाचा होता. त्या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले व रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला.

३. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

अ ) जावळीच्या मोर्‍यांच्या वाटेला कोणी का जात नसे ?

जावळीचे जंगल अत्यंत दाट होते. भर दिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिवकाव नव्हता. त्यात वाघ, लांडगे, अस्वले इत्यादी श्वापदे संचार करत. मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती ! त्यामुळे जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे.

आ ) शिवरायांनी यशवंतराव मोरे याला कोणते पत्र धाडले ?

शिवरायांनी यशवंतराव मोरे याला पत्र धाडले की , ‘ तुम्ही राजे म्हणविता. राजे आम्ही. आम्हास श्रीशंभूने राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *